स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनक्रम


(जन्म-शके १८०५ वैशाख कृ ६ || निर्वाण- शके १८८७ फाल्गून शु.६) 

१८८३ मे २८ - जन्म भगूर गाव(जि. नाशिक). 
१८९२ - आईचे निधन. 
१८९८ मे - देवीपुढे सशस्त्र क्रांतीची शपथ. 
१८९९ सप्टें ५ वडिलांचे निधन. 
१९०० जाने १ -मित्रमेळ्याची स्थापना. 
१९०१ मार्च - विवाह. 
१९०१ डिसे.१९ - मैट्रिक परीक्षा उत्तीर्ण. 
१९०१ जाने.२४ - पुणे येथील फर्गसन महाविद्यालयात प्रवेश. 
१९०४ मे. - अभिनव भारत या आंतरराष्ट्रीय क्रांतीसंस्थेची स्थापना. 
१९०५ दसरा - विदेशी कपडयांची होळी. 
१९०५ डिसे.२१ - बी.ए. परीक्षा उत्तीर्ण. 
१९०६ जून ९ - लंडनला प्रयाण. 
१९०७ मे १० - १८५७ च्या स्वातंत्र-युद्धाचा लंडनमध्ये सुवर्ण महोत्सव. 
१९०७ जून - मॅझिनीचे चरित्र प्रसिद्ध केले. 
१९०८ मे २ - लंडनमध्ये प्रथम शिवजयंत्युत्सव. 
१९०८ - हॉलंडमधे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर(इंग्रजी) गुप्तपणे छापले. 
१९०९ मे - बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण,पण पदवीस नकार. 
१९०९ जून - वडील बंधु श्री.बाबाराव यांना जन्मठेप-काळेपाणी-शिक्षा. 
१९०९ जुलै धिंग्रा यांच्याकडून कर्झन वायलीचा वध. 
१९०९ आक्टो.२४ - लंडनमधे दसर्‍याचा उत्सव, अध्यक्ष--- बॅ.गांधी. 
१९१० मार्च १३ - पॅरिसहून लंडनला येताच अटक. 
१९१० जुलै ८ -मार्सेलिस बंदरात समुद्रात उडी. 
१९१० डिसे.२४ - जन्मठेप काळ्यापाणीची शिक्षा. 
१९११ जाने.३१ - दुसर्‍या जन्मठेपेची शिक्षा. 
१९११ जुलै ४ - अंदमानच्या कारावासास(एकलकोंडीत) प्रारंभ. 
१९१९ एप्रिल - (बाबारावांच्या पत्नी)सौ.येसुवहिनींचे निधन. 
१९२० नोव्हें. - धाकचे बंधू डा. नारायणरावांची अंदमान-कारागृहात जाऊन भेट. 
१९२१ मे.२ - बाबाराव आणि तात्याराव दोघांची अंदमानातून हिंदुस्थानांत पाठवणी. 
१९२१ नि १९२२ - अलिपूर(बंगाल) नि रत्नागिरी येथील बंदिवास. 
१९२३ - मुंबईचे राज्यपाल लाईड जार्ज यांची सावरकरांच्या मुक्ततेविषयी चर्चा. 
१९२४ जाने.६ - राजकारणात भाग न घेणे व रत्नागिरी जिल्ह्यात. राहणे या दोन अटींवर येरवडा कारागृहातून सुटका. 
१९२५ जाने.७ - कन्या प्रभात हिचा जन्म. 
१९२६ जाने.१० - हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद साप्ताहिक मुंबईत सुरू केले. 
१९२७ मार्च १ - रत्नागिरीस गांधीजी-सावरकर भेट आणि चर्चा. 
१९२७ मार्च १७ - पुत्र विश्वास याचा जन्म. 
१९३० नोव्हें १६ -रत्नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन 
१९३१ फेब्रु.२२ -पतित-पावन मंदिरात श्री. लक्ष्मी-नारायण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा. 
१९३१ फेब्रु २५ - मुंबई इलाखा अस्पृश्यता-निवारक-परिषद अधिवेशन ६ वे अध्यक्ष. 
१९३१ एप्रिल २६ -सोमवंशी महार-परिषद- अध्यक्ष. पतित-पावन मंदिरात सभा. 
१९३१ सप्टें २२ -नेपाळ-राजपुत्र हेमसमशेर जंगबहादुर राणा यांनी भेट दिली. 
१९३१ सप्टें १७ -श्रीगणेशोत्सवात भंगीबुवांचे कीर्तन.महाराचा गीतापाठ 
आणि ७५ स्पृश्या- स्पृश्य महिलांचे पहिले सहभोजन. 
१९३७ मे १० -रत्नागिरी स्थलबद्धतेतून विनाअट संपूर्ण मुक्तता. 
१९३७ डिसे.३० -हिंदुमहासभा १९ व्या अ. भा. अधिवेशनाचे अध्यक्ष,कर्णावती.लागोपाठ सात वर्षे अ.भा.हि.म. सभेच्या अध्यक्षपदीं निवड. 
१९३८ एप्रिल १५ - महाराष्ट्र-साहित्य-संमेलन २२ वे अधिवेशन,मुंबई, अध्यक्ष. 
१९३९ फेब्रु १ -निजाम विरोधी भागानगरचा निःशस्त्र प्रतिकार प्रारंभ. 
१९४१ जून २२ -सुभाषचंद्र बोस अवचित सावरकर-सदनात येऊन भेटले. 
१९४१ डिसे.२५ -भागलपूरचा नागरिक-सभा-स्वातंत्र्यार्थ लढा. 
१९४३ मे २८- ६१व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात अ.भा. सत्कार आणि निधी समर्पण. 
१९४३ आगस्ट- १४ नागपूर-विद्यापीठाने डी. लिट. ही सन्मान्य पदवी दिली. 
१९४३ नोव्हें ५- अखिल महाराष्ट्र नाट्य-संमेलन अध्यक्ष. 
१९४५ मार्च १६ -वडील बंधु श्री.गणेशपंत(तथा बाबाराव) यांचे निधन, सांगली. 
१९४५ एप्रिल १९ -अ.भा. संस्थान-हिंदूसभा-अधिवेशन(बडोदे) अध्यक्ष. 
१९४५ मे ८ -कन्या प्रभात चा विवाह, पुणे. 
१९४६ एप्रिल -मुंबई सरकारनं संपूर्ण सावरकर-वाङमयावरील बंदी उठवली. 
१९४७ आगस्ट- १५ दुख:मिश्रित आनंद! घरावर भगवा ध्वज नि राष्ट्र- ध्वज उभारले. 
१९४८ फेब्रु. -५ गांधी-वधानंतर सुरक्षा-निर्बंधान्वये अटक. 
१९४९ फेब्रु १० -गांधीहत्या अभियोगातून निष्कलंक सुटका. 
१९४९ आक्टो १९ - धाकटे बंधू डा. नारायणराव यांचे निधन. 
१९४९ डिसे. - अ.भा.हि.म. सभा, कलकत्ता- अधिवेशनाचे उद्- घाटक. 
१९५० एप्रिल ४ - पाक पंतप्रधान लियाकत अली ची दिल्ली भेट म्हणून अटक नि बेळगाव कारागृह-वास. 
१९५२ मे १०-१२ - अभिनव-भारत संस्थेचा सांगता-समारंभ, पुणे. 
१९५५ फेब्रु.- रत्नागिरीच्या पतित-पावन मंदिराच्या सुवर्ण महोत्सवाचे अध्यक्ष. 
१९५६ जुलै २३ -लो.टिळक जन्मशताब्दी महोत्सव,पुण्यात भाषण. 
१९५६ नोव्हें १० - अ.भा.हि.म. सभा,जोधपूर- अधिवेशनाचे उद्-घाटक. 
१९५७ मे १० - दिल्लीत १८५७ च्या स्वातंत्र्युद्ध-शताब्दी महोत्सवात भाषण. 
१९५८ मे २८ - ७५ वा वाढदिवस. मुंबई महापालिकेकडून सत्कार. 
१९५९ आक्टो ८ - पुणे विद्यापीठाने डी-लिट सन्मान्य पदवी(घरी येऊन) दिली. 
१९६० डिसें. २४ - मृत्युंजय-दिन-साजरा(या दिवशी ५०वर्षे जन्मठेप संपत होती). 
१९६१ जाने.१४ - मृत्युंजय-दिनानिमित्त शेवटचे प्रकट भाषण(पुणे). 
१९६२ एप्रिल १५ - मुंबईचे राज्यपाल श्रीप्रकाश घरी येऊन भेटले. 
१९६३ मे २९ - मांडीचे हाड मोडल्याने रूग्णालयात.( मुंबई) 
१९६३ नोव्हें ८ - पत्नी सौ. यमुनाबाई यांचे निधन. 
१९६४ आगस्ट १ - मृत्युपत्र केले. 
१९६४ आक्टो. - भारत सरकारकडून मासिक रू.३०० मानधन देऊन सन्मान. 
१९६५ सप्टें - गंभीर आजार. 
१९६६ फेब्रु १ - अन्न आणि औषध वर्ज्य करून प्रायोपवेशनास प्रारंभ. 
१९६६ फेब्रु २६ - शनिवारी सकाळी १०-३० वाजता देह-विसर्जन. वय८३ 
१९६६ फेब्रु २७ -महायात्रेत मुंबई सेंट्रल स्थानकासमोर रा.स्व. संघाची सैनिकी मानवंदना, मुंबईच्या चंदनवाडी विद्युत्-दाहिनीत अग्निसंस्कार.... 

No comments:

Post a Comment