Pages

नवबौध्द आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ


स्व. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा हरिजनांच्या उध्दारासाठी धर्मांतराच्या गोष्टीवर विचार करत होते तेव्हा म्यानमार (ब्रह्मदेश) च्या पंतप्रधानांनी त्यांना रंगूनला येण्याचे निमंत्रण दिले होते. तेथील प्रमुख नेते श्री. उं छां ठुन; जे तेथील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते, भारतात आले होते. त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची ओळख आधीपासून होती. म्हणून भारतात आल्यावर ते श्रीगुरुजींना भेटले व त्यांच्याकडून त्यांनी संघाची माहिती घेतली. नवबौध्द आणि शेष हिंदू समाजाच्या समन्वयासंबंधी चर्चा करताना ते म्हणाले की, बौध्द धर्म भारताबाहेर भारताच्या सनातन धर्माचेच रूप आहे. मुंबईत संघाच्या एका विराट कार्यक्रमात ते श्रीगुरुजींसमवेत उपस्थित राहिले. त्यांच्या स्वागतासाठी देशातील मोठमोठया शहरात नवबौध्दांचे जे कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमांना संघाच्या स्वयंसेवकांनी पूर्ण सहकार्य दिले. चेन्नई (मद्रास) चा शेवटचा कार्यक्रम पार पडल्यावर आपल्या देशाला परतताना श्री. उं छां ठुन यांनी नवबौध्दांच्या नेत्यांना आग्रहाने सांगितले की, आपला बौध्द धर्मात प्रवेश राजकीय हेतूसाठी नसेल तरच आपली उन्नती होईल. या कार्यक्रमात आपल्यासाठी सर्वात जवळचे सहकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक होऊ शकतात. त्यांच्याशी आपले संबंध वाढवले पाहिजेत.

- एक स्वयंसेवक

No comments:

Post a Comment